#पैनगंगा #निसर्ग #chandrapur #कोरपना #vidharbh #nature
निसर्ग ही परमेश्वराने माणसाला विनामुल्य दिलेली
एक सुंदर देणगी आहे. माणूस हा देखील याच निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. निसर्ग पृथ्वी, आप, अग्नी, वायु आणि आकाश या पाच तत्त्वांनी बनवलेला आहे. मानवी देहदेखील या पंचतत्त्वातूनच तयार झालेला आहे. म्हणूनच माणसाचे जीवन निसर्गावर अवलंबून आहे. माणूस या निसर्गात जन्माला येतो, जीवन जगतो आणि याच निसर्गात विलिन होतो.