आज सादर झालेल्या बजेटने महाराष्ट्र आणि मुंबईची सगळ्यात मोठी निराशा केल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातून देशाला सर्वात जास्त कर जातो, पण बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ठोस काहीही नाही, शेतकऱ्यांचीही फसवणूक करणारं बजेट असल्याची टीकाही थोरात यांनी केली आहे.