राज्यात अनलॉक १.० च्या तिसऱ्या टप्प्यात आजपासून खाजगी कार्यालयांसह अन्य व्यवसाय सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग कामावर जाण्यासाठी निघाल्याचं पाहिला मिळालं.
पण पहिल्याच दिवशी डोंबिवलीतल्या इंदार गांधी चौकात लोकांची बससाठी मोठी गर्दी झाली. त्यातच बसचं नियोजन नसल्याने लोकांच्या त्रासात भर पडली.